tag:blogger.com,1999:blog-181383184008402024-03-20T13:25:44.449-07:00स्वातंत्र्यसमर १८५७ चाAnonymoushttp://www.blogger.com/profile/07668914059854999853noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-18138318400840.post-85475679449089967432010-10-01T04:26:00.000-07:002010-10-01T04:26:03.478-07:00१० मे २००७<span class="Apple-style-span" style="color: #ffd966;">१० मे २००७ . स्वतंत्र भारत देशात श्वास घेणार्या आपल्या जनतेपैकी फ़ार कमी लोकांना हे ठाऊक असेल की आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्याचा पाया दीडशे वर्शांपूर्वी या दिवशी घातला गेला . “शिपायांचे बंड” म्हणून इंग्रजांनी हेटाळलेल्या , पण पुढे “हिंदुस्थानचे पहिले स्वातंत्र्यसमर” म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गौरविलेल्या एका लढ्याची रणदुंदुभी मेरठ येथे याच दिवशी फ़ुंकली गेली . मंगल पांडे नावाच्या ठिणगीने उठलेल्या या आगीने पाहता पाहता वणव्याचे रूप धारण केले आणि इंग्रजी राज्य भस्मसात होऊन जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती . ही आग शमवण्यात इंग्रजांना यश आलं असलं तरी याच आगीतून पुढे क्रांतीचे निखारे फ़ुलले . झाशीची रणचंडी राणी लक्ष्मीबाई , श्रीमंत नानासाहेब पेशवे , बहादूरशहा जफ़र, अवधची बेगम हजरतमल , कुंवरसिंग, रंगो बापूजी आणि सेनापती तात्या टोपे अशी अनेक तेजस्वी ज्वाळा या वणव्यातून उठल्या आणि पुढे अनेक अनाम वीरांनादेशकार्यासाठी प्रेरणास्त्रोत बनून गेल्या .<br />
<br />
<br />
केवळ अपयशी ठरला म्हणून या उठावाचे महत्त्व कमी होत नाही . हिंदु मुस्लिम ऐक्याचे आगळे दर्शन या निमित्ताने घडले . दुर्दैवाने आपण ते टिकवू शकलो नाही . आज या घटकेला त्याची निकडीची गरज निर्माण झाली आहे . या लढ्याची आणि त्यातल्या लढवय्यांची जेवढी दखल खुद्द इंग्रजांनी घेतली , तितकी आपल्याला कधी घ्यावीशी वाटली नाही . याचा अर्थ आपण या वीरांना विसरलेलो आहोत असा नाही . स्मारकं उभारून आणि चौक, रस्ते इत्यादींना नावे देऊन त्यांची स्मृती केवळ कागदावरच किंवा भाषणापुरतीच कशी राहिल याची पुरेपुर काळजी सत्ताधार्यांनी घेतलेली आहे . म्हणूनच राणी लक्ष्मीचे गोडवे गाणार्या समाजात स्त्री भ्रूणहत्या सर्रास घडताना दिसतात . “पुराणातली वांगी पुराणात” तद्वत “इतिहासातली वांगी इतिहासात” असंच चित्रदिसतं . शिवाजी आणि लक्ष्मी जरूर जन्मावेत पण शेजारी अशी आपली मनोवृत्ती झालेली आहे . या पार्श्वभूमीवर १८५७ च्या वीरांचे स्मरण न करणे हा करंटेपणा ठरेल . हा उठाव चेतवला तो कुणा राजा रजवाड्याने नव्हे , तर मंगल पांडे , एका साध्या शिपायाने . थोडक्यात सामान्यातूनच अशा असामान्य पर्वाचा आरंभ होतो हे वास्तवनक्कीच प्रेरणादायी आहे .<br />
<br />
या स्वातंत्र्ययुद्धातला एक काळजाला चटका लावणारा पण तितकाच बाणेदार प्रसंग असा…<br />
<br />
या स्वातंत्र्ययुद्धातला चिरडण्यात ब्रिटिशांना यश आल्यावर कैदेत असलेल्या शेवटच्या बादशहाला, बहादूरशहा जफ़रला त्याचे हुजरे कुचेष्टेने एक तबक पेश करतात . त्यावरचे मखमली आच्छादन बाजूला केल्यावर बादशहाला आपल्या दोन पुत्रांची मस्तके दिसतात . हुजरे जफ़रला म्हणतात की हिंदुस्थानची तलवार आता शांत झाली आहे . त्यावर त्या बहादूरशहाने त्या प्रसगातही धीरोदात्तप असे उद्गार काढले की ,<br />
<br />
“वादीयों मे लू रहेगी जब तलक ईमान की<br />
<br />
दिल्ली क्या लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की..!”<br />
<br />
<br />
आज वादीयां तशाच आहेत , तेग सुद्धा आहे . पण देशाभिमानची झुळुक वाहत नाही ही आमची शोकांतिका..!<br />
<br />
</span> <br />
<div style="text-align: center;"><span class="Apple-style-span" style="color: #ffd966;">“जय हिंद”</span></div>Anonymoushttp://www.blogger.com/profile/07668914059854999853noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-18138318400840.post-22392689972903302442008-11-13T23:01:00.000-08:002008-11-13T23:24:55.909-08:00<p>स्टार माझा या व्रुत्तवाहीनीच्या पहिल्या मराठी "ब्लाग माझा" या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा, दि. ८ नोव्हे. २००८... माझा ब्लाग "स्वातंत्र्यसमर १८५७ चा" - विशेष सन्मान</p><p><span class=""></span><iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.blogger.com/video.g?token=AD6v5dxAyIeqotbIcpj_NQuRZEYfgsyYs0qo2YxBgPilTsXZj6EsOAQJogsVj5Zkjtk8NDMBALpK_HJ_t7_mhQ' class='b-hbp-video b-uploaded' frameborder='0'></iframe></p>Anonymoushttp://www.blogger.com/profile/07668914059854999853noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-18138318400840.post-19109289017788822702008-11-08T02:26:00.000-08:002008-11-08T02:32:50.708-08:00माझी मुलाखतशनिवार, <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjjtEw3e3_nd5j3-Vy7j_DzLFiU5wig02Te_vVoMA-nHdDbl3kCeiCwCteTWsTmDf4Nf3pFIkJON8uxHb_X6WSDXQlPzWwDhzSxXP1pTUXBz0hGvtLr383LA04-i4rLkVZwvN-d-H5R/s1600-h/My+interview+in+Nashik+Times.JPG"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5266231753658296258" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 269px; CURSOR: hand; HEIGHT: 400px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjjtEw3e3_nd5j3-Vy7j_DzLFiU5wig02Te_vVoMA-nHdDbl3kCeiCwCteTWsTmDf4Nf3pFIkJON8uxHb_X6WSDXQlPzWwDhzSxXP1pTUXBz0hGvtLr383LA04-i4rLkVZwvN-d-H5R/s400/My+interview+in+Nashik+Times.JPG" border="0" /></a>दि. ८ नोव्हे. २००८ माझी मुलाखत<br />टाईम्स ऑफ इंडीया (नाशिक टाईम्स)Anonymoushttp://www.blogger.com/profile/07668914059854999853noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-18138318400840.post-21178042748531240132008-09-18T05:02:00.000-07:002008-09-18T07:14:03.548-07:00अभिप्रायमित्रांनो तुमच्या अभिप्रायाचे स्वागत आहे.<br />- प्रशांतAnonymoushttp://www.blogger.com/profile/07668914059854999853noreply@blogger.com21